स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र  भारतातील न्यायव्यवस्था 

आज आपण स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र  संसदीय शासन पद्धतीची ओळख पाहणार आहोत. इयत्ता आठवी च्या इतिहास व नागरीकशास्च्र विषयामध्ये नागरीकशास्त्राचे इकुण सहा पाठ दिलेले आहेत. स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र संसदीय शासन पद्धतीची ओळख यापाठावरील स्वाध्याय Swadhay आभ्यासणार आहोत. नागरीकशास्त्र विषयातील पाठ पुढीलप्रमाणे आहेत. पाठ पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख, पाठ दुसरा भारताची संसद, पाठ तिसरा केंद्रीय कार्यकारी मंडळ, पाठ चौथा भारतातील न्यायव्यवस्था, पाठ पाचवा राज्यशासन आणि पाठ सहावा नोकरशाही.

स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र  भारतातील न्यायव्यवस्था

स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र  भारतातील न्यायव्यवस्था

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(१) कायद्यांची निर्मिती ......... करते. 

(अ) कायदेमंडळ 

(ब) मंत्रिमंडळ 

(क) न्यायमंडळ 

(ड) कार्यकारी मंडळ 

(२) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक ......... करतात. 

(अ) प्रधानमंत्री 

(ब) राष्ट्रपती 

(क) गृहमंत्री 

(ड) सरन्यायाधीश 

२. संकल्पना स्पष्ट करा. 

(१) न्यायालयीन पुनर्विलोकन 

(२) जनहित याचिका

 ३. टीपा लिहा. 

(१) दिवाणी व फौजदारी कायदा 

(२) न्यायालयीन सक्रियता 

४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

(१) समाजात कायद्यांची गरज का असते? 

(२) सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा. 

(३) भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत ?

५. पुढील तक्ता पूर्ण करा.
न्यायमंडळाची रचना

स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र भारतातील न्यायव्यवस्था

भारतातील न्यायव्यवस्था स्वाध्याय-

1/15
(१) कायद्यांची निर्मिती ------ करते.
(अ) कायदेमंडळ
(ब) मंत्रिमंडळ
(ड) कार्यकारी मंडळ
(क) न्यायमंडळ
2/15
(२) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक ------ करतात.
(अ) प्रधानमंत्री
(ब) राष्ट्रपती
(क) गृहमंत्री
(ड) सरन्यायाधीश
3/15
(३) ------ बाळगल्यास समाजात मतभिन्नता टोकाची असूनही संघर्ष उद्भवत नाहीत.
(अ) सावधानता
(ब) धैर्य
(क) सहिष्णुता
(ड) श्रद्धा
4/15
(४) स्वातंत्र्य, समता व न्याय यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात, तेव्हा ------ व्याप्ती अधिक वाढते.
(अ) मूल्यांची
(ब) लोकशाहीची
(क) न्यायमंडळाची
(ड) कायदयांची
5/15
(५) नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण ------ होते.
(अ) प्रधानमंत्र्यांद्वारे
(ब) राष्ट्रपतींद्वारे
(क) सामाजिक संस्थांद्वारे
(ड) न्यायालयांद्वारे
6/15
(६) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ----- व्या वर्षी सेवानिवृत्त होतात.
(अ) ५८
(ब) ६०
(क) ६२
(ड) ६५
7/15
(७) ------ हा देशाचा मूलभूत कायदा असतो.
(अ) संस्थात्मक नियम
(ब) न्यायमंडळ
(क) संविधान
(ड) राष्ट्रपतींचे आदेश
8/15
(८) संसदेचा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानविरोधी असेल; तर तो कायदा किंवा ती कृती बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार ------- असतो.
(अ) प्रधानमंत्र्याला
(ब) लोकसभाध्यक्षाला
(क) सर्वोच्च न्यायालयाला
(ड) राष्ट्रपतींना
9/15
(९) प्रत्येक घटकराज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार ------- देण्यात आला आहे.
(अ) संविधानाला
(क) सर्वोच्च न्यायालयाला
(ब) संसदेला
(ड) राष्ट्रपतींना
10/15
(१०) सध्या आपल्या देशात ------ उच्च न्यायालये आहेत.
(अ) २०
(ब) २२
(क) २४
(ड) २९
11/15
(११) भारताच्या न्यायव्यवस्थेचे स्वरूप ------
(अ) राज्यपाल
(ब एकात्म पद्धती
(क) सरन्यायाधीश
(ड) ६२ वर्षे
12/15
(१२) सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश -----
(२) सरन्यायाधीश
(ब) राज्यपाल
(क) सर्वोच्च न्यायाधीश
(ड) प्रधानमंत्री
13/15
(१३) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तिवर्ष ------
(अ) ६० वर्ष
(ब) ६२ वर्ष
(क) ६५ वर्ष
(ड) ७० वर्ष
14/15
(१४) जिल्हा न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक यांच्याकडून होते --------
(अ) मुख्यमंत्री
(ब) प्रधानमंत्री
(क) राज्यपाल
(ड) सरन्यायाधीश
15/15
(१५) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची यांच्याकडून होते ---------
(अ) मुख्यमंत्री
(ब) सरन्यायाधीश
(क) राज्यपाल
(ड) राष्ट्रपतींकडून
Result:

२. संकल्पना स्पष्ट करा. 

(१) न्यायालयीन पुनर्विलोकन 

उत्तर-न्यायालयीन पुनर्विलोकनः- सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचे संरक्षण करणे होय. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो हे तुम्हांला माहीत आहे. या कायद्याचा भंग हाेईल अथवा त्याविरोधी असेल असे कायदे संसदेला करता येत नाहीत. कार्यकारी मंडळाचेही प्रत्येक धोरण आणि कृती संविधानाशी सुसंगत असावी लागते. संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असल्यास तो कायदा आणि ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते व रद्द करते. न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात 

(२) जनहित याचिका

उत्तर- जनहित याचिकाः- समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे. त्यासाठी जनहितार्थ याचिका महत्त्वाच्या असतात. जनहित याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल झालेली याचिका. न्यायालय त्यावर विचार करून निर्णय देते.

 ३. टीपा लिहा. 

(१) दिवाणी व फौजदारी कायदा - 

उत्तर- व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येतात.उदा., जमिनीसंबंधीचे वाद, भाडेकरार, घटस्फोट इत्यादी. संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते.गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. उदा., चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या, इत्यादी. या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला जातो. पोलीस त्याचा तपास करतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो. गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूपही गंभीर असते.

(२) न्यायालयीन सक्रियता- 

उत्तर-  न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे. गेल्या काही दशकांपासून न्यायालयाच्या या प्रतिमेत बदल झाला असून न्यायालय सक्रीय झाले आहे. याचा अर्थ न्यायालय आता संविधानातील न्याय, समतेची उद्‌दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे. त्यासाठी जनहितार्थ याचिका महत्त्वाच्या ठरल्या आहेत

४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

(१) समाजात कायद्यांची गरज का असते? 

उत्तर- व्यक्ती-व्यक्तींमध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादींबाबत भिन्नता असते. सहिष्णुता बाळगल्यास या बाबींमधून संघर्ष निर्माण होत नाहीत. परंतु मतभिन्नता टोकाची झाल्यास त्यातून संघर्ष निर्माण होतात व त्यांचे निराकरण निःपक्षपाती दृष्टीने कायद्यांच्या आधारे होण्याची गरज असते. त्यासाठी न्यायमंडळासारख्या निःस्पृह यंत्रणा आवश्यक असतात.  

अ) शासनाचा एखादा निर्णय अथवा कायदा लोकांना अन्यायकारक वाटू शकतो व त्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यासाठी

आ) संविधानातील सामाजिक न्याय व समता या उद्‌दिष्टांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी

इ) समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग आणि तृतीयपंथी (transgender) इत्यादी समाजघटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत करण्यासाठी

ई) स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते. लोकशाही बळकट होण्यासाठी

उ) कायद्याचे अधिराज्य न्यायमंडळामुळे सुरक्षित राहते. गरीब, श्रीमंत, प्रगत-अप्रगत, स्त्री-पुरुष या सर्वांना कायदा समान रीतीने लागू पडतो हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होते.

ऊ) न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते. कायद्यानुसार तंट्यांचे निराकरण होते व कोणत्याही गटाची, व्यक्तीची दडपशाही किंवा हुकूमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. वरील सर्व कारणासाठी समाजात कायद्यांची गरज असते

(२) सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा. 

उत्तर- न्यायदानाचे काम कोणाच्याही दबावाखाली होता कामा नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी सर्वोच्य न्यायालय खालीलप्रमाणे कार्ये करते.

सर्वोच्च न्यायालयाची कार्ये
सर्वोच्च न्यायालयाची कार्ये खालीलप्रमाणे-
(१) संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्रशासन व घटकराज्ये, घटकराज्ये व घटकराज्ये, केंद्रशासन व घटकराज्येविरूद्ध अन्य घटकराज्येयांच्यातील तंटे सोडवणे.
(२) नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, त्यासाठी आदेश देणे.
(३) कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे, आपल्याही निर्णयांचा पुनर्विचार करणे.
(४) सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे


(३) भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत ?

न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी तरतुदी
न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी तरतुदी केलेल्या तरतुदी खालीलप्रमाणे आहेत.
(१) न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. निष्णात कायदेतज्ज्ञ असलेल्या, उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्ती पात्र मानल्या जातात.
(२) न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो.
(३) न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ६५व्या वर्षी, तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ६२व्या वर्षी सेवानिवृत्त होतात
(४) न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते, त्यावर संसदेत चर्चा होत नाही.
(५) न्यायाधीशांच्या कृती व निर्णयांवर व्यक्तिगत टीका करता येत नाही. न्यायालयाचा अवमान करणे हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते. या तरतुदींमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच पण त्याच बरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते.
(६) संसदेला न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही. परंतु न्यायाधीशांना या पदावरून दूर करण्याचा व त्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा अधिकार आहे.
न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी तरतुदी केलेल्या तरतुदी वरीलप्रमाणे आहेत.


५. पुढील तक्ता पूर्ण करा.
न्यायमंडळाची रचना

न्यायमंडळाची रचना
सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय
सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश
भारताचे सर्वोच्च न्यायालय-नवी दिल्ल २४ उच्च न्यायालये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी